सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

राजीनामा घेतला नसता तर भुजबळ जेलमध्ये गेले असते.

 sharad pawar news : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ विरुद्ध विधान केलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार छगन भुजबळाचा राजीनामा घेतला नसता तर छगन भुजबळ जेलमध्ये गेले असते. असे विधान केलेले आहे. तेलगी प्रकरणावरून शरद पवारांनी आपल्याकडून राजीनामा घेतला पण तेलगी प्रकरणात आपणच विरोध म्हणून कारवाई केली होती. असे अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधल्या सभेत स्पष्ट केले. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्यांना उत्तर दिले.        मी लढण्यासाठी तयार आहे तुम्ही पण राहा आपण जी लढत आहोत ती विचारांची लढाई आहे मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नका लोकांची शक्ती ही आपल्या मागे आहे. आपल्या पक्षावर टीका करणारे अजित पवार गटांकडे लक्ष देऊ नका, असे पवार यांनी म्हटले आहे.

शिवसेना बंडखोरांची कधीच होऊ शकत नाही - आदित्य ठाकरे

मुंबई : शिवसेना पक्ष हा बाळासाहेब गटाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू आहे.शुक्रवारच्या सुनावणीनंतर प्रतिक्रिया देताना आदित्य म्हणाले, निवडणूक ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सामान्य शिवसैनिकांचा आहे.  जे बाहेर पडले आहेत, ते गद्दार आहेत. त्यांची शिवसेना कधीच होऊच शकत नाही. देशात सत्यमेव जयते आहे, त्यामुळे सत्याचा म्हणजे आमचाच विजय होणार हे निश्चित आहे. फक्त हा विषय किती दिवस प्रलंबित ठेवणार आणि लांबवणार एवढाच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे आणि शिंदे आयोगाला लेखी उत्तर आम्ही देऊच; पण गेली सहा ते सात महिने घटनाबाह्य सरकार स्थापन झाले आहे. देशात असे कधीही झाले नव्हते. कायदे तोडून मोडून हे सत्तेत आले आहेत. एका व्यक्तीच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी देशाचे, राज्याचे आणि जनतेचे नुकसान होत आहे. असा प्रकार देशाने यापूर्वी कधीच बघितला नव्हता, असेही ते म्हणाले. //

काश्मिरात भरपावसातही भारत जोडो यात्रा

 कठुआ : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हटली मोडवरून भारत जोडो यात्रेचा या राज्यातील प्रवास शुक्रवारी सुरू झाला. काश्मीरमधील यात्रेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. यावेळी पावसानेही हजेरी लावल्यामुळे राहुल गांधींनी प्रथमच आपल्या पांढऱ्या टी-शर्टवर जॅकेट घातले होते आणि त्याचीच चर्चा होती. भारत जोडो यात्रेने गुरुवारी संध्याकाळी पंजाबमधून जम्मू- काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. दोन्ही राज्यांच्या काँग्रेस अध्यक्षांनी ध्वजाचे आदान-प्रदान केल्यानंतर यात्रा सीमेवरच मुक्कामी थांबली होती. शुक्रवारी कठुआ जिल्ह्यातील हटली मोडवरून यात्रेचा काश्मीरमधील प्रवास सुरू झाला.  पावसाने व्यत्यय आणला असला तरी राहुल यांनी आपल्या समर्थकांसह यात्रेच्या अखेरच्या टप्प्याला उत्साहात सुरुवात केली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने राज्यसभा खासदार संजय राऊत यात्रेत सहभागी झाले. देशातील वातावरण वेगाने बदलत असून, लोक त्यांचा नेता ठरवतील, असे राऊत म्हणाले. राज्यातील इतर नेतेही यात्रेत सहभागी झाले. जम्मू- पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या यात्रेला बघण्यासाठी काश...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...

भारत व्यापारासाठी नेहमीच खुला !

 दावोस: भारत तसेच देशाचे सरकार व्यवसायासाठी सदैव तयार आहे, असे महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी सांगितले. त्यांनी परदेशी कंपन्यांना देशाच्या अफाट क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित केले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) च्या वार्षिक बैठक - २०२३ च्या पार्श्वभूमीवर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि सल्लागार फर्म डेलॉइट यांनी आयोजित केलेल्या सत्राला त्या संबोधित करत होत्या. स्मृती इराणी म्हणाल्या की,महिलांना खूप फायदा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील NDI प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय आम्ही उद्योग आणि इतर सर्वांसोबत एकत्र काम करण्यावर आमचा विश्वास आहे. भारत आयुष्मान भारतच्या रूपाने जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा चालवतो. या अंतर्गत १० कोटी कुटुंबे येतात. भौगोलिक सीमा ओलांडून आरोग्य सुविधा पुरवण्यात येते.  या योजनेचा करण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. जग जेव्हा करोडो लोकांना पुन्हा कौशल्य देण्याची गरज बोलतो, तेव्हा केवळ भारतच ते लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे. भारताने स्वदेशी कोविड लस विकसित करण्यासाठी इतर देशांसोबत सहकार्य केले; परंतु ते व्...

राखी सावंत हिची चार तास चौकशी एका अभिनेत्रीची आक्षेपार्ह क्लिप प्रसारित केल्याचा आरोप

 दाखल करण्यात आली असून त्याबाबत अंबोली पोलिसांनी गुरुवारी तिची चौकशी केली.  मुंबई : विचित्र विधाने आणि सावंत हिच्याविरोधात तक्रार वर्तनामुळे सातत्याने वादांच्या लाटांवर असणारी अभिनेत्री राखी सावंत समाजमाध्यमांतील एका पोस्टमुळे अडचणीत आली आहे. एका बॉलीवूड अभिनेत्रीसंबंधीच्या आक्षेपार्ह चित्रफितीची लिंक आणि छायाचित्रे प्रसिद्ध केल्याप्रकरणी राखी चित्रपट अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने तिच्या ट्विटर खात्यावरून राखी सावंतविरोधातील एफआयआरची माहिती देऊन तिला पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली होती. मात्र अंबोली पोलिसांनी राखी सावंत हिची सुमारे चार तास चौकशी केल्यानंतर तिला घरी जाण्याची परवानगी दिल्याचे सांगण्यात येते. राखी सावंत हिने चौकशीत सहकार्य केल्याने तसेच तिचा मोबाईल फोन अधिक तपासासाठी पोलिसांच्या हवाली केल्याने तिला तातडीने अटक करण्याचे कोणतेही कारण नव्हेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.