आपल्या भारतात प्रतेक ठिकाणी काही नियम आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्या भारताचा सर्व राज्यकारभार हा संविधानानुसार चालतो त्या संसदेवर चालतो भारतातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रतेक व्यक्तीला न्याय मिळतो तर न्याय देण्याचे काम न्यायमंडळ करते आपण जर विचार केले तर भारतात अनेक शासन पद्धती आहेत त्यामध्ये मग संसद तर जाणून घेऊया भारताची संसद ? संसदीय शासन पद्धतीत संसद महत्त्वाची असते भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते त्यानुसार संसदेत राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयातून भाग घेता येत नाही संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते भारतातील लोकसभा भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणता...