सीधे मुख्य सामग्री पर जाएं

पाकमध्ये संपत्तीचा खुलासा न करणारे २७१ आमदार-खासदार निलंबित निवडणूक आयोगाची कारवाई

 इस्लामाबाद : वारंवार ताकीद दिल्यानंतरही स्वतःकडील संपत्तीचा खुलासा न करणाऱ्या सुमारे २७१ आमदार व खासदारांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ईसीपी) मंगळवारी निलंबित केले आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीचे १३६ व सिनेट सभागृहाचे २१ खासदार आणि राज्य विधानसभेतील ११४ आमदारांचा यात समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईमुळे लोकप्रतिनिधींना मोठा दणका बसला आहे.

देशातील खासदार व आमदारांना स्वतःकडील संपत्ती व आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंतची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. त्यानंतर काही कारणास्तव हीच मुदत १६ जानेवारी, २०२३ पर्यंत वाढवण्यात



ELECTION COMMISSION PAKISTAN

आली; परंतु तरीही बहुतांश लोकप्रतिनिधींनी आयोगाचे आदेश पाळले नाहीत. संपत्तीचा खुलासा करण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे अखेर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारत देशभरातील सुमारे २७१ आमदार व खासदारांना निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांना सणसणीत चपराक बसली आहे. संपत्ती जाहीर न करणाऱ्यांना निलंबित केले जाईल, असा इशारा आयोगाने अनेकदा दिला होता; मात्र त्याकडे २७१ आमदार व खासदारांनी कानाडोळा केला. त्यामुळे नॅशनल असेंब्लीचे १३६ व सिनेट सभागृहाचे २१ खासदार आणि राज्य विधानसभेतील ११४

आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे वृत्त पाकमधील आघाडीचे वृत्तपत्र 'डॉन'ने दिले आहे.

विशेष बाब अशी की,निलंबित केलेल्या आमदारांमध्ये पाकव्याप्त पंजाब विधानसभेतील एकाही आमदाराचा समावेश नाही; कारण काही दिवसांपूर्वीच पंजाबची विधानसभा विसर्जित करण्यात आली आहे, तर सिंध प्रांताचे ४८, आदिवासीबहुल खैबर पख्तुनख्वा प्रांताचे ५४ आणि बलुचिस्तानमधील १२ आमदारांचे सदस्य निलंबित झाल्याचे डॉनने म्हटले आहे.

दरम्यान, देशाचे पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ' (पीटीआय) पक्षाच्या बहुतांश खासदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे निलंबित केलेल्या आमदार व खासदारांमध्ये पीटीआयच्या नेत्यांची संख्या मोठी आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आधुनिक पद्धतीची शेती आणि जास्त उत्पन्न

   आधुनिक पद्धतिने शेती  शेती व्यवसाय हा भारताचा महत्त्वाचा कणा मानला जातो कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या आणि बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो या व्यवसायामुळे शेतीला आणि शेतीतील व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे शेतीमुळे खूप सारे व्यवसाय उदयाला आले शेती हा व्यवसाय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे यामुळे आताच्या काळाची गरज बनली आहे  उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान बनले आहे   अशा परिस्थितीत वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या  तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतात पीक वाढीसाठी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहीत असणे व त्यांचा अवलंब कसा करणे हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे  सध्याच्या काळात जागतिकीकरणाच्या युगामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणे खूपच कठीण झाले आहे दिवसेंदिवस पुरवठा करणे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या शेतीचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळात शेत...

राजौरी हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सुपूर्द अमित शाहांची घोषणा, काश्मीरच्या सुरक्षेचा घेतला आढावा

 श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या म राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) न सोपवल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली. याचवेळी संरक्षण दलांचे प्रमुख, नायब राज्यपाल मनोज सिन्हा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी काश्मिरातील सुरक्षा • व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा एकदिवसाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तपासन एनआयएकडे सोपवला आहे. यासोबतच मागील दीड वर्षात जम्मू-काश्मिरात घडलेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांची चौकशी एनआयए करणार आहे. यात राज्य पोलीस हे एनआयएला सक्रियपणे मदत करणार आहेत. सीमापार दहशतवाद, , पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि चीनसोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर, काश्मीरची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करणे व अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठ...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...