सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संजय राऊतांच्या 'त्या' विधानाने डॉक्टर नाराज उपचार

उद्धव ठाकरेंनी दखल घेऊन काढली समजूत

 कल्याण : विरोधी पक्षावर टीका करण्याच्या नादात शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी कोविड काळामधील डॉक्टर आणि नर्सच्या सेवेबाबत केलेल्या विधानावरून डॉक्टरांमध्ये रोष निर्माण झाला. आयएमएसह कल्याणमधील प्रमुख वैद्यकीय संघटनांनी याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्यावर थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच त्याची गंभीर दखल घेत डॉक्टरांची समजूत काढली.



खा. संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना 'कोविडच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले' असे विधान केले. राज्यातील विविध डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांपर्यंत या वक्तव्याची माहिती कळताच त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. विशेषतः

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांनी तर उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून राऊत यांच्या वक्तव्यावर आपली नाराजी जाहीर प्रकट केली. आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी कल्याण जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्याशी संपर्क साधून खा. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर परखड निषेध नोंदवला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर साळवी यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून डॉक्टरांची नाराजी त्यांच्या कानावर घातली.

उद्धव ठाकरे यांनीही त्याची दखल घेत डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. महाविकास आघाडी सरकार असताना कोविड काळात डॉक्टर आर्मीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीतील खासगी डॉक्टरांनी केलेल्या कामाची आठवण डॉ. प्रशांत पाटील यांनी करून दिली. तसेच खा. राऊत यांनी डॉक्टर आणि नर्सबाबत असे विधान करायला नको होते, असेही सांगितले. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही खासगी डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांनी कोविडमध्ये केलेल्या कामाबाबत सहमती दर्शवली. तसेच राज्यातील सर्व डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांवर आपला विश्वास आणि त्यांच्याती मनात आदर असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकल्याचे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आधुनिक पद्धतीची शेती आणि जास्त उत्पन्न

   आधुनिक पद्धतिने शेती  शेती व्यवसाय हा भारताचा महत्त्वाचा कणा मानला जातो कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या आणि बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो या व्यवसायामुळे शेतीला आणि शेतीतील व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे शेतीमुळे खूप सारे व्यवसाय उदयाला आले शेती हा व्यवसाय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे यामुळे आताच्या काळाची गरज बनली आहे  उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान बनले आहे   अशा परिस्थितीत वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या  तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतात पीक वाढीसाठी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहीत असणे व त्यांचा अवलंब कसा करणे हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे  सध्याच्या काळात जागतिकीकरणाच्या युगामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणे खूपच कठीण झाले आहे दिवसेंदिवस पुरवठा करणे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या शेतीचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळात शेत...

राजौरी हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सुपूर्द अमित शाहांची घोषणा, काश्मीरच्या सुरक्षेचा घेतला आढावा

 श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या म राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) न सोपवल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली. याचवेळी संरक्षण दलांचे प्रमुख, नायब राज्यपाल मनोज सिन्हा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी काश्मिरातील सुरक्षा • व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा एकदिवसाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तपासन एनआयएकडे सोपवला आहे. यासोबतच मागील दीड वर्षात जम्मू-काश्मिरात घडलेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांची चौकशी एनआयए करणार आहे. यात राज्य पोलीस हे एनआयएला सक्रियपणे मदत करणार आहेत. सीमापार दहशतवाद, , पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि चीनसोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर, काश्मीरची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करणे व अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठ...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...