सिमेंटचे रस्ते ४० वर्षे टिकणार; दुकानदारी बंद होणार असल्याने टीका उपमुख्यमंत्र्यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई : मुंबईत दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा एवढेच आतापर्यंत सुरू होते. सिमेंटचे रस्ते केल्यास पुढील ४० वर्षे नवीन रस्ते करण्याचे काम पडणार नाही. पण ज्यांची संपूर्ण हयातच घोटाळे करण्यात गेली त्यांना सिमेंटचे रस्ते होत असल्याचे दुःख होत आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
![]() |
मुंबईत ६ हजार कोटींचे ४०० किमीचे सिमेंटचे रस्ते बांधण्याबाबत निविदा जारी केल्या आहेत. यात लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकारने मोठा घोटाळा केला असून, कंत्राट देण्याबाबत सेटिंग झाल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी बीकेसीवर जाऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंवर हल्ला चढवला.
फडणवीस म्हणाले, ज्यांची संपूर्ण हयात घोटाळे करण्यात गेली, त्यांना मुंबईत सिमेंटचे रस्ते होत असल्याचे दुःख होत आहे. मुंबईत सिमेंटचे रस्ते केले, तर पुढील ४० वर्षे नवीन रस्ते करण्याचे काम पडणार नाही.
२०१८ मध्ये जेव्हा मुंबईतील रस्त्यांच्या कामांची चौकशी झाली, तेव्हा येथील शेकडो रस्त्यांमध्ये खालचा थरच नव्हता. गेली २५ वर्षे अशाच प्रकारची कामे केली गेली. दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि त्यातून पैसे खायचे, एवढेच आतापर्यंत सुरू होते. आता त्यांची दुकानदारी बंद होणार असल्याचे लक्षात आल्याने आरोप करण्याचे काम सुरू आहे. पण यांना आता जनताच उत्तर देईल, अशा शब्दांत शिवसेनेला लक्ष्य केले.
'त्या' कामांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्याच हस्ते ! शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येऊन शिवसेनेने केलेल्या कामांचे उद्घाटन करत असल्याबाबत केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मोदी ज्या २ मेट्रो लाईन्सचे उद्घाटन आहेत त्याच्या दोन्ही कामांचे भूमिपूजन मोदी यांच्याच हस्ते २०१५ मध्ये करण्यात आले होते. आता त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत आहे. या सर्व कामांच्या परवानग्या केंद्र आणल्या आहेत. हे झोपेत बोलणारे लोक आहेत. यांची टक्केवारी ठरली नाही म्हणून यांनी वर्क ऑर्डर काढली नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी महाविकास आघाड कारभारावर टीका केली.
