सीधे मुख्य सामग्री पर जाएं

आयटी नियम दुरुस्तीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला - काँग्रेस

 नवी दिल्ली : केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान अधिनियमात दुरुस्ती करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर छुप्या पद्धतीने केलेला हल्ला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया देत काँग्रेसने गुरुवारी त्यास तीव्र विरोध दर्शवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार जनतेच्या मनावर स्वतःची प्रतिमा बिंबवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. आयटी अधिनियम दुरुस्ती मागे घेण्यात यावा व त्यावर संसदेत विस्तृत चर्चा करण्याची मागणीही काँग्रेसने केली.



'माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ दिशानिर्देश व डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम- २०२१ दुरुस्ती मसुदा' माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने नुकताच सादर केला. यात फेक न्यूज हटवण्याचा अधिकार सरकारला प्राप्त होणार आहे. माहिती हा तर स्वतःची प्रतिमा बिंबवण्याचा प्रयत्नव प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालयाने पुष्टी केल्यानंतर संबंधित फेक न्यूज बातमी मागे घेता येणार आहे; परंतु हा नवा बदल झाल्याने फेक न्यूजच्या नावाखाली इतर बातम्या दडपल्या जातील व सर्वच अधिकार केंद्र सरकारच्या हाती एकवटतील, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी केला. 

इंटरनेटचा गळा दाबणे व पत्रसूचना कार्यालयाच्या (पीआयबी) माध्यमातून ऑनलाईन सामग्रीला हटवणे, हीच मोदी सरकारच्या तथ्य तपासणीची व्याख्या आहे. सरकार ऑनलाईन बातम्यांच्या बाबतीत 'न्यायाधीश' बनत आहे.

भविष्यात पीआयबी हे मोदी सरकारच्या प्रतिमेनुसार कार्य करणार हे निश्चित असल्याची टीका त्यांनी केली. मोदी सरकार जर बातम्यांमधील सत्यता तपासणार असेल तर केंद्र सरकारचे तथ्य कोण तपासणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, मोदी सरकारकडून माध्यमांना चिरडणे ही काही नवीन गोष्ट नाही. देशात 'गोदी मीडिया' शब्द रूढ झाला आहे. आता 'गोदी सोशल मीडिया' बनत असल्याचा आरोप पवन खेडा यांनी केला.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आधुनिक पद्धतीची शेती आणि जास्त उत्पन्न

   आधुनिक पद्धतिने शेती  शेती व्यवसाय हा भारताचा महत्त्वाचा कणा मानला जातो कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या आणि बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो या व्यवसायामुळे शेतीला आणि शेतीतील व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे शेतीमुळे खूप सारे व्यवसाय उदयाला आले शेती हा व्यवसाय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे यामुळे आताच्या काळाची गरज बनली आहे  उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान बनले आहे   अशा परिस्थितीत वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या  तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतात पीक वाढीसाठी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहीत असणे व त्यांचा अवलंब कसा करणे हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे  सध्याच्या काळात जागतिकीकरणाच्या युगामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणे खूपच कठीण झाले आहे दिवसेंदिवस पुरवठा करणे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या शेतीचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळात शेत...

राजौरी हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सुपूर्द अमित शाहांची घोषणा, काश्मीरच्या सुरक्षेचा घेतला आढावा

 श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या म राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) न सोपवल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली. याचवेळी संरक्षण दलांचे प्रमुख, नायब राज्यपाल मनोज सिन्हा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी काश्मिरातील सुरक्षा • व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा एकदिवसाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तपासन एनआयएकडे सोपवला आहे. यासोबतच मागील दीड वर्षात जम्मू-काश्मिरात घडलेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांची चौकशी एनआयए करणार आहे. यात राज्य पोलीस हे एनआयएला सक्रियपणे मदत करणार आहेत. सीमापार दहशतवाद, , पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि चीनसोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर, काश्मीरची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करणे व अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठ...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...