सीधे मुख्य सामग्री पर जाएं

ऐश्वर्या राय-बच्चन यांना तहसीलदारांची नोटीस

 सिन्नर : तालुक्यातील ठाणगावजवळील आडवाडी शिवारातील जमिनीचा अकृषक कर भरण्याबाबत सिन्नरच्या तहसलीदारांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्यासह तालुक्यातील १२०० मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवल्या आहेत. येत्या दोन दिवसांत संबंधित कराचा भरणा करण्यात येणार असल्याचे ऐश्वर्या राय यांच्या वतीने कळवण्यात आले आहे.



ऐश्वर्या राय यांनी सन २००७- ०८ मध्ये आडवाडी शिवारात गट क्रमांक १२६ मधील १ हेक्टर २२ आर जमीन स्वतःच्या नावावर घेतली असून सध्या त्या जमिनीवर सुझलॉन पॉवर कंपनीची पवनचक्की आहे. त्याचप्रमाणे आणखी काही कंपन्यांच्या पवनचक्क्याही या परिसरात आहेत. राय यांच्या जमिनीचा सन २०२२-२३ चा २१ हजार ९६० रुपये इतका अकृषक कर भरण्याची नोटीस ऐश्वर्या राय बच्चन प्रोप्रा. फर्म या नावाने काढण्यात आली असून नोटिसीचा खर्च म्हणून १० रुपयांची आकारणीही करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अधिनियमान्वये खातेदारास नमुना १ अंतर्गत ही सिन्नरमधील जमिनीचा अकृषक कर भरण्याची सूचना नोटीस बजावण्यात आल्याचे तहसीलदार एकनाथ भंगाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

९ जानेवारी रोजी ही नोटीस बजावण्यात आली असून त्या तारखेपासून १० दिवसांच्या आत कर शासनजमा न झाल्यास अतिरिक्त शास्तीसह रकमेच्या वसुलीसाठी सक्तीची कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव शिवारात डोंगराळ शिवारात अनेक पवनचक्क्या उभारल्या असून सुझलॉन कंपनीने अनेक बड्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीतून या परिसरात पवनऊर्जेचे मोठे जाळे उभे केले आहे. यात मोठे राजकीय नेते,अभिनेत्यांचा समावेश असून नगर जिल्ह्यातही प्रख्यात क्रिकेटपटूंनी गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. सिन्नर तालुक्यात एकूण १२०० अकृषक मालमत्ताधारकांना कर भरण्याबाबत नोटिसा काढण्यात आल्या असून यात अग्रो व्हेंचर्स, रामा हँडीक्राफ्ट, बिंदू ऊर्जा लिमिटेड, एअर कंट्रोल प्रा.लि., मेटकोन इंडिया, सी. जे. पटेल आणि कंपनी, राजस्थान गम प्रा. लि., एल. बी. कुंजीर इंजिनीयर प्रा. लि., एस. के. शिवराज, आय. टी. सी. मराठा लि., हॉटेल लीला व्हेंचर लि. आदी कंपन्यांचा समावेश आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आधुनिक पद्धतीची शेती आणि जास्त उत्पन्न

   आधुनिक पद्धतिने शेती  शेती व्यवसाय हा भारताचा महत्त्वाचा कणा मानला जातो कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या आणि बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो या व्यवसायामुळे शेतीला आणि शेतीतील व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे शेतीमुळे खूप सारे व्यवसाय उदयाला आले शेती हा व्यवसाय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे यामुळे आताच्या काळाची गरज बनली आहे  उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान बनले आहे   अशा परिस्थितीत वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या  तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतात पीक वाढीसाठी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहीत असणे व त्यांचा अवलंब कसा करणे हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे  सध्याच्या काळात जागतिकीकरणाच्या युगामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणे खूपच कठीण झाले आहे दिवसेंदिवस पुरवठा करणे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या शेतीचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळात शेत...

राजौरी हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सुपूर्द अमित शाहांची घोषणा, काश्मीरच्या सुरक्षेचा घेतला आढावा

 श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या म राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) न सोपवल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली. याचवेळी संरक्षण दलांचे प्रमुख, नायब राज्यपाल मनोज सिन्हा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी काश्मिरातील सुरक्षा • व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा एकदिवसाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तपासन एनआयएकडे सोपवला आहे. यासोबतच मागील दीड वर्षात जम्मू-काश्मिरात घडलेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांची चौकशी एनआयए करणार आहे. यात राज्य पोलीस हे एनआयएला सक्रियपणे मदत करणार आहेत. सीमापार दहशतवाद, , पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि चीनसोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर, काश्मीरची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करणे व अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठ...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...