सीधे मुख्य सामग्री पर जाएं

२०२४ च्या लोकसभेसाठी भाजपची धुरा नड्डांच्याच हाती ॥ पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवला

 नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४पर्यंत वाढवण्यात आला आहे.



पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी एकमताने हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय कार्यकारिणीने सामाजिक व आर्थिक ठराव मंजूर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक ठराव मांडला होता. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला.

भाजपाध्यक्ष म्हणून नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. हा प्रस्ताव सर्वसंमती मंजूर करण्यात आल्याचे अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजप अधिक लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. 

जनसंघाच्या स्थापनेपासून आतापर्यंत भाजपमध्ये बूथ पातळीसह राष्ट्रीय अध्यक्षाची निवड पक्षाच्या राज्यघटनेनुसार झाली आहे, असे शाह म्हणाले. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली लढलेल्या निवडणुकांमधील विजयाबद्दल शाह यांनी कौतुक केले. केंद्र सरकारच्या योजना पक्षाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचे मतांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी नड्डा यांनी पार पाडली. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात आणि नड्डांच्या अध्यक्षतेखाली भाजप आगामी सार्वत्रिक निवडणुकी तगत निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्याने विजयी होईल, असा दावा शाह यांनी केला.

भाजपाध्यक्ष म्हणून सलग दुसरा कार्यकाळ मिळणारे नड्डा हे पक्षातील तिसरे नेते ठरले आहेत. यापूर्वी लालकृष्ण अडवाणी आणि अमित शाह यांना सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. राजनाथ सिंह दोन वेळा भाजपाध्यक्ष राहिले होते. मात्र त्यांचा कार्यकाळ सलग नव्हता. जे. पी. नड्डा यांना जून २०१९ मध्ये कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले होते. यानंतर ३० जानेवारी २०२० रोजी ते पूर्णकालिक अध्यक्ष झाले. येत्या २० जानेवारीला त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. तो आता जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे. पुढील वर्षी जून महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका होतील. याचाच अर्थ यावर्षी होणाऱ्या ९ राज्यांमधील विधानसभा निवडणूक आणि पुढील वर्षी होणारी सार्वत्रिक निवडणूक भाजप नड्डाच्यांच अध्यक्षतेखाली लढेल. हिमाचल प्रदेश ही कर्मभूमी असलेल्या नड्डा यांची जन्मभूमी बिहारचे पाटणा आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आधुनिक पद्धतीची शेती आणि जास्त उत्पन्न

   आधुनिक पद्धतिने शेती  शेती व्यवसाय हा भारताचा महत्त्वाचा कणा मानला जातो कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या आणि बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो या व्यवसायामुळे शेतीला आणि शेतीतील व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे शेतीमुळे खूप सारे व्यवसाय उदयाला आले शेती हा व्यवसाय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे यामुळे आताच्या काळाची गरज बनली आहे  उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान बनले आहे   अशा परिस्थितीत वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या  तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतात पीक वाढीसाठी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहीत असणे व त्यांचा अवलंब कसा करणे हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे  सध्याच्या काळात जागतिकीकरणाच्या युगामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणे खूपच कठीण झाले आहे दिवसेंदिवस पुरवठा करणे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या शेतीचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळात शेत...

राजौरी हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सुपूर्द अमित शाहांची घोषणा, काश्मीरच्या सुरक्षेचा घेतला आढावा

 श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या म राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) न सोपवल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली. याचवेळी संरक्षण दलांचे प्रमुख, नायब राज्यपाल मनोज सिन्हा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी काश्मिरातील सुरक्षा • व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा एकदिवसाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तपासन एनआयएकडे सोपवला आहे. यासोबतच मागील दीड वर्षात जम्मू-काश्मिरात घडलेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांची चौकशी एनआयए करणार आहे. यात राज्य पोलीस हे एनआयएला सक्रियपणे मदत करणार आहेत. सीमापार दहशतवाद, , पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि चीनसोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर, काश्मीरची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करणे व अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठ...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...