सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

प्रदीप शर्मा यांची वैद्यकीय तपासणीला परवानगी एनआयएच्या याचिकेवर विशेष न्यायालयाचे आदेश

मुंबई : अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले. त्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करून शर्मा यांच्या वैद्यकीय स्थितीबाबत सर्वसमावेशक अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना दिले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटके आणि गाडीचे मालक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना १७ जून २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. शर्मा गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील सरकारी रुग्णालयात दाखल आहेत.  त्यांची वैद्यकीय अँटिलिया बॉम्ब प्रकरण तपासणी करण्याची मागणी करणारा अर्ज एनआयएने गुरुवारी विशेष एनआयए न्यायालयात केला आहे. शर्मा यांना कोणताही आजार नसून ते तंदुरुस्त आहेत. आजारपणाच्या नावाखाली ते सरकारी रुग्णालयाचा गैरवापर करत असल्याचा दावा एनआयएने केला. हा दावा शर्मा यांनी फेटाळून लावला. त्यांना खासगी रुग्णालयात वैद्यकीय...

कोरोनाचा असर

 कोरोनामुळे झालेल्या नुकसानीचे, जादा खर्चाचे; त्यातल्या भ्रष्टाचाराचे अनेक आकडे समोर आले. या काळात आरोग्यव्यवस्थेवर आलेला ताण आणि त्यातील कमतरतेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकड्यांवरूनही बरीच भवति न भवति झाली. पण, त्या दोन वर्षांत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवल्याने विद्यार्थ्याचं किती नुकसान झालं याची आकडेवारी समोर आली नव्हती. बुधवारी जाहीर झालेल्या 'असर' अहवालाने आपल्या भावी पिढीवर त्या 'लॉकडाऊन'चा नेमका काय असर पडला, हे आता समोर आले आहे. 'असर'चा अहवाल दरवर्षी प्रकाशित होतो आणि त्यातून आपल्या शिक्षणव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली जातात. ज्यांना ही आकडेवारी अडचणीची वाटते किंवा ज्यांना आपल्या बेफिकीरीचा पुरावा म्हणून तो पाहावा लागतो, त्यांचा या वार्षिक सर्वेक्षणालाच विरोध आहे. शिक्षणव्यवस्थेत अनागोंदी आहे की नाही? शिक्षण क्षेत्र दुर्लक्षित आहे की नाही? शिक्षणाबाबतची आपली धोरणं शिक्षणतज्ज्ञांपेक्षा बाहेरच्याच व्यक्ती ठरवतात की नाही? शिक्षणाबाबत समानता नाही, हे खरं आहे की नाही? वासारखे प्रश्न विचारले, तर त्यांची उत्तरं त्यांच्याकडूनही होकारार्थीच येतील. पण, या सा...

आयटी नियम दुरुस्तीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला - काँग्रेस

 नवी दिल्ली : केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान अधिनियमात दुरुस्ती करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर छुप्या पद्धतीने केलेला हल्ला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया देत काँग्रेसने गुरुवारी त्यास तीव्र विरोध दर्शवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार जनतेच्या मनावर स्वतःची प्रतिमा बिंबवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. आयटी अधिनियम दुरुस्ती मागे घेण्यात यावा व त्यावर संसदेत विस्तृत चर्चा करण्याची मागणीही काँग्रेसने केली. 'माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ दिशानिर्देश व डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम- २०२१ दुरुस्ती मसुदा' माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने नुकताच सादर केला. यात फेक न्यूज हटवण्याचा अधिकार सरकारला प्राप्त होणार आहे. माहिती हा तर स्वतःची प्रतिमा बिंबवण्याचा प्रयत्नव प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालयाने पुष्टी केल्यानंतर संबंधित फेक न्यूज बातमी मागे घेता येणार आहे; परंतु हा नवा बदल झाल्याने फेक न्यूजच्या नावाखाली इतर बातम्या दडपल्या जातील व सर्वच अधिकार केंद्र सरकारच्या हाती एकवटतील, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी केला.  इंटरनेटच...

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी धास्तावले राहुल गांधी काँग्रेसने कल्याणकारी योजनांतून जनतेची भीती दूर केली

 पठाणकोट: मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांमुळे देशातील शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. यूपीए सरकारने मनरेगा योजना आणली. यासोबतच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, शहर विकास मिशन, हरित व श्वेतक्रांती घडवत जनतेच्या मनातील भीती दूर केली, असा दावा त्यांनी केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचे (आप) सरकार दिल्लीतील रिमोट कंट्रोलनुसार चालत असल्याचा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' गुरुवारी पंजाबमधील पठाणकोट शहरात पोहोचली. यावेळी राहुल गांधी यांनी सभेला संबोधित करीत प्रतिद्वंदी भाजप व आम आदमी पक्षावर हल्ला चढवला. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात द्वेष, हिंसाचार व भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जात व धर्म व भाषेच्या आधारे भांडण लावण्याचे कार्य त्यांनी केले.  केंद्र सरकारच्या सर्वच योजना भीतिदायक असतात. प्रत्यक्षात त्याचा कोणालाही लाभ मिळत नाही. नवे कृषी कायदेसुद्धा तसेच होते. याउलट यूपीए सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मनरेगा, शहर विकास मिशन, हरित व श्वेतक्रां...

महाराष्ट्रात पोटनिवडणूक जाहीर कसबापेठ, चिंचवडसाठी २७ फेब्रुवारीला मतदान २ मार्चला मतमोजणी

 मुंबई : भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अनुक्रमे पुण्यातील कसबापेठ, चिंचवड विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी पोटनिवडणूक घोषित केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी पुढील महिन्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी २ मार्चला होणार आहे. IMG credit to pexal.com निर्णयाकडे लक्ष निवडणूक आयोगाने महाविकास आघाडीच्या पोटनिवडणुकीच्या पूर्ण कार्यक्रमाचीही घोषणा केली आहे. त्यानुसार, या पोटनिवडणुकीची अधिसूचना ३१ जानेवारीला जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी अशी असून, ८ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १० फेब्रुवारी २०२३ ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्याने या दोन्ही मतदारसंघांत आचारसंहिता लागू झाली आहे. कसबापेठच्या आ. मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर २०२२ रोजी, तर लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले होते. शिवसेना (ठाकरे) आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक घेण्यात आली. या...

भाजपविरोधात एकजूट घडवण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली - राहुल

 शिमला: केंद्रातील सत्तारूढ . भाजप व जातीयवादी आणि फूट पाडणाऱ्या शक्तींविरुद्ध जनतेला एकजूट करण्यासाठी आम्ही भारत जोडो यात्रा काढली असून, त्यास उदंड प्रतिसाद मिळत असल्याचा - दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल - गांधी यांनी बुधवारी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात द्वेष, • हिंसाचार व दहशत पसरवली आहे;  परंतु संघाच्या मनसुब्यांना आम्ही 1 प्रत्युत्तर देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. कन्याकुमारी येथून काढण्यात आलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा हिमाचल प्रदेशात पोहोचली आहे. सीमेवरील घटोटा गावाजवळ पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर व प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंग यांना यात्रेचा ध्वज सोपवला. कडाक्याच्या थंडीतही हिमाचलचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व आमदारांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी यात्रेचे सहर्ष स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत भाजप व संघावर चौफेर टीका केली. देशातील मूठभर अब्जाधीशांना लाभ पोहोचविणे हा नोटबंदी, जीएसटी व कृषीविरोधी कायद्याचा हेतू होता. या अजेंड्यात शेतकरी, ...

सिमेंटचे रस्ते ४० वर्षे टिकणार; दुकानदारी बंद होणार असल्याने टीका उपमुख्यमंत्र्यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : मुंबईत दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा एवढेच आतापर्यंत सुरू होते. सिमेंटचे रस्ते केल्यास पुढील ४० वर्षे नवीन रस्ते करण्याचे काम पडणार नाही. पण ज्यांची संपूर्ण हयातच घोटाळे करण्यात गेली त्यांना सिमेंटचे रस्ते होत असल्याचे दुःख होत आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मुंबईत ६ हजार कोटींचे ४०० किमीचे सिमेंटचे रस्ते बांधण्याबाबत निविदा जारी केल्या आहेत. यात लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकारने मोठा घोटाळा केला असून, कंत्राट देण्याबाबत सेटिंग झाल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी बीकेसीवर जाऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंवर हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले, ज्यांची संपूर्ण हयात घोटाळे करण्यात गेली, त्यांना मुंबईत सिमेंटचे रस्ते होत असल्याचे दुःख होत...